नेमेचि येतो मग पावसाळा..

हल्ली दरवर्षी शाळा कॉलेजातून विज्ञान दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीनं काही वैज्ञानिक प्रकल्प करावेत अशी अपेक्षा असते. कामाच्या धकाधकीतून वेळ काढून काही शिक्षक हे काम अंगावर घेतात देखील . काहींना ते न करण्याचा पर्याय नसल्यानं करावंच लागतं. विद्यार्थ्यांची स्थिती देखील फार वेगळी नसते. सब घोडे बारा टके हा नियम अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांसाठी लावतात आणि विज्ञान प्रकल्पाचं लचांड या मुलांच्या मागे लागतं.

अशा एका साजऱ्या केलेल्या विज्ञान दिनाचा मी नुकताच साक्षीदार होतो. या लेखात मी पाहिलेल्या विज्ञान प्रकल्पांचे दोष मी वर्णन करून सांगणार नाही. शाळा कॉलेजातले विज्ञान प्रकल्प कसे असावेत (म्हणजे त्यांना मुळात विज्ञान प्रकल्प म्हणता येईल) आणि त्या प्रकल्पांची, प्रदर्शनांची उद्दिष्टं काय असावीत याबद्दल मी काही विचार मांडणार आहे. शिवाय अशा प्रकल्पांची उदाहरणं सांंगणार आहे.

विज्ञान प्रकल्प निवडताना पुढील गोष्टींचा विचार केला तर जास्त योग्य होईल.

वर उल्लेख केलेल्या "नियमावलीत" विषय वैज्ञानिक असणे, भरपूर आकडेवारीने प्रयोग सिद्ध होणे आणि चांगला प्रकल्प अहवाल लिहिणे या तीन गोष्टींना महत्व दिले आहे ही गोष्ट वाचकांच्या लक्षात येईल. या नियमांत परिस्थितीनुरूप बदल करता येईल. पण विद्यार्थ्याला मिळणारा वैज्ञानिक अनुभव आणि त्यातून त्याने/तिने काढलेले निष्कर्ष हे साऱ्याचे उद्दिष्ट असायला हवे.

काही उदाहरणे

पुढे काही वेगळ्या खर्चिक नसलेल्या प्रकल्पांची उदाहरणे दिली आहेत. ही यादी वाढवता येईल. त्यात बसणारा प्रयोग तुम्ही केला असेल तर आकडेवारी सहित आम्हाला पाठवा.

मार्गदर्शन

अशा प्रकल्पांसाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करणं आवश्यक असतं. पण सर्वच प्रकल्पाच्या विषयांचा शिक्षकांनी सखोल अभ्यास करावा ही अपेक्षा ठेवता येणार नाही. त्यासाठी चांगल्या दर्जाच्या पुस्तकांचं वाचन हवं. असं एक पुस्तक सुचवायला मला नक्की आवडेल. श्री. अरविंद गुप्ता यांनी लिहिलेली अशी पुस्तक मालिकाच आहे. त्यांच्या पुस्तकांत अगदी कमी खर्चात करता येणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होतो.

इंटरनेटवर अशा प्रकल्पांचं मार्गदर्शन घेणं सोयीचं असतं पण त्यातल्या माहिती विषयी आपण जागरूक राहिलं पाहिजे. ही माहिती पडताळून पहाण्याची प्रकल्प करणाऱ्याची जबाबदारी असते. इंटरनेटवर माहिती मिळेल पण ज्ञान आपल्यालाच मिळवावं लागेल याचं भान विद्यार्थी आणि शिक्षकांनी ठेवलं पाहिजे.

स्पर्धा की सहकार्य ?

विज्ञान प्रकल्पांची स्पर्धा घेण्यात फार वाईट काही नाही. परंतु विषयाचं ज्ञान , अनुभव आणि प्रकल्प स्वतः करताना मिळालेला आनंद हे खरं बक्षिस आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं आणि शिक्षकांनी त्याची जाणीव करून द्यायला हवी. हा भाग आज सर्वात जास्त कठीण आहे हे मला मान्य आहे.

नेमेचि येतो मग पावसाळा...

नेमेचि येतो मग पावसाळा ।। हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा ।।

असं जुनं वचन आहे. पावसाळ्याचा उपयोग करून पिण्याचं पाणी आणि पिकांसाठी पाणी मिळवता आलं नाही तर तो पावसाळा वाया जाणार नाही का?

विज्ञान दिन साजरा करताना आपण जर त्यातून अनुभव आणि ज्ञान मिळवण्याचं (जे थोडं कष्टप्रद आहे हे खरंय) ध्येय ठेवलं तर हा सण वाया जाणार नाही. पुढची पिढी अनुभवानं प्रयोगातून पडताळा पहात मिळणाऱ्या ज्ञानानं समृद्ध झाली पाहिजे. तरच उद्या चॅट-जीपीटी बरोबरच्या स्पर्धेत त्यांना उतरता येईल. नाहीतर बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर भिक्षापात्रं घेऊन रांगा लावण्याची वेळ येणार आहे.


मुख्यपान-HOMEPAGE

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
vidnyanmail

लेखकः विज्ञानदूत, तारीखः Friday 02 December 2022 04:27:28 PM IST